मुंबई : शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गायीच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील शेतक-यांचे प्रश्न गंभीर होत आहेत, ते सोडवले नाहीत, तर शेतक-यांना हातात शस्त्र घ्यावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्याचबरोबर गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवण्याची गरज असल्याचं सांगत, पाकला धडा शिकवण्याची गरज असल्याचंही उद्धव म्हणाले.