मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचा सूर आज मातोश्रीवर झालेल्या शिवेसेनेचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे या निवडणुका स्वबळावर लढण्याचाही भावना उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त करण्यात आलीय. उद्धव ठाकरेंनीही या भूमिकेला पाठिंबा असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.


बैठकीत याआधी भाजपसोबत लढून काय मिळालं? जयललिता,लालूप्रसाद, ममता बॅनर्जी भाजपशिवाय लढून सत्ता मिळवतात, मग शिवसेना का मिळवू शकणार नाही असंही या बैठकीत उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.