मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांवर टीका सुरु झाल्यानंतर महापालिका निवडणुकीमध्ये युती देखील तुटली. शिवसेना सत्तेत असूनही विरोधकासारखी वागत होती त्यामुळे भाजपने देखील शिनसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युती तुटल्यानंतर थेट मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरु झाली. शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून वाच्यता झाली. पण १३ तारखेच्या निकालानंतर खरंच काय चित्र दिसेल हे आताच सांगता येणं कठीण आहे. पण शिवसेनेकडून जरी सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा होत असली तर भाजपला असं वाटत नाही. 


शिवसेना अजिबात सत्तेतून बाहेर पडणार नाही. भाजप सरकार पूर्ण 5 वर्षं टिकेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बोलून दाखवला. झी 24 तासवरील रणसंग्राम कार्यक्रमात ते बोलत होते.


पाहा व्हिडिओ