मुंबई : शिवसेनेनं फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेना नेता मनीषा कायंदे यांनी आरोप केला आहे की, मुख्यमंत्री सरकारच्या कामकाजाबाबत गंभीर नाहीत. आणि सरकारच्या कामकाजामध्ये पारदर्शकता देखील नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना कोणत्याही क्षणी फडणवीस सरकारचं समर्थन काढून घेऊ शकते. सरकारमधून शिवसेना कोणत्याही क्षणी बाहेर पडू शकते. महाराष्ट्राचे लोकं या सरकारला कंटाळले आहेत. हे सरकार खोटे आश्वासने देतं. अशा शब्दात त्यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे.


मुंबईसह राजभरात मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका होत आहेत. पण या निवडणूकीचा परिणाम राज्यातील सरकारवर होणार का ही येणारी वेळच सांगेल.