वसई : येथे पिकनिकसाठी आलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. सुरुच्या बागेकडे येथे ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 प्रथमेश शिशुपाल आणि हितेश पाटील अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यासोबत असेलला आकाश जोगदंड किनाऱ्यावर बसून राहिल्यानं तो बचावला आहे. हे तिघे आचोळे गावातले आहेत.


समुद्राच्या खोलीचा अंदांज न आल्यानं दोघं बुडाल्याचं सांगितलं जातंय. दोघेही घरातले एकुलते एक होते. समुद्र किनाऱ्यावर कोणतीच सुरक्षा व्यावस्था नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.