मुंबई : उत्तराखंडला नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेले मुंबईतले दोन तरुण गंगा नदीत बुडल्याची माहिती हाती आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातले 80 विद्यार्थी ऋषिकेशला गेले होते. त्यात मुंबईच्या ठाकूर कॉलेजच्या 10 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी विनय शेट्टी आणि करण जाधव हे दोघे गंगा नदीत बुडाल्याची माहिती मिळाली आहे.


 त्या दोन्ही विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी पोहोचले असून विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर शोधकार्य सुरु आहे. अद्याप त्यांचा तपास लागलेला नाही.