मुंबई : वांद्र्याच्या बीकेसी मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचारसभा सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


LIVE उद्धव ठाकरे


- दुपारी पुण्यातली मुख्यमंत्र्यांची सभा पाहिली... संपूर्ण सभा पारदर्शक


- सभा लवकर संपवाल का? आमच्याकडे माणसं पाहिजे, असा निरोप आला आहे


- तुम्हाला नावच बदलायचं असेल तर औरंगाबादचं संभाजीनगर करा


- सगळ्या महापालिकांमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता येणार


- व्यंकैय्या नायडू म्हणाले मूळा-मुठा नाव बदला, आता काय नाव 'गाजर' ठेवायचं?


- मुंबईची तुलना पाटण्यासोबत करू नका... शिवसैनिक असेपर्यंत मुंबई सुरक्षित


- तुम्ही म्हणालात की, औकात दाखवू, आमचे कपडे उतरवू, 23 तारखेला बघा मुंबईकर तुमचं काय करतात ते... त्यांना औकात शिवसेनाच दाखवणार


- आमची लेना किंवा देना बँक नाही, अशी भरगच्च भरलेली ही आमची बँक, तुमच्यासारख्या रिकाम्या खुर्च्या नाही... तुमची 'नो अॅक्सेस' बँक


- आरोग्य शिबीरात मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासणार


- भाजपची 'ती' जाहिरात पाहिली, ही कोणती संस्कृती?... भाजपला आता 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे


- भिवंडीतील म्हात्रेंच्या मारेकरी अद्यापही मोकाट का?


- मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला आता लोकही कंटाळले


- आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी तुमचं मंत्रीमंडळ किती बरबटलेलं आहे ते बघा आधी


- शिक्षणमंत्री असा दिला आहे की जो तक्रारीसाठी फोन केला, तर कॉलेज बंद करण्याच्या धमक्या देतो


- नमामी गंगेचा पैसा मोदींच्या खिशात गेला?


- मुंबईत माता भगिनींना भितीने जगण्याची गरज नाही... सीसीटीव्ही आहेत म्हणून नाही, तर शिवसेना आहे म्हणून


- मुबंईत जलबोगदे आम्ही केले, तुमच्या खालून हे बोगदे कधी गेले ते तुम्हाला कळलंदेखील नाही


- आम्ही जनतेच्या पैशाला कधी हात लावला नाही आणि लावणारही नाही


- कल्याण-डोंबिवलीला 6500 कोटी देऊ म्हणाले, अजून एकही रुपया दिलेला नाही


- मोदी म्हणतात पवार माझे राजकीय गुरू... पवार काका पुतण्यास तुरुंगात पाठवणार होते...


- सामनानं यांना बेजार केलंय... त्यामुळेच बंदीची मागणी, ही आणीबाणी नाही तर काय?


- 'राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!' हा टिळकांचा अग्रलेख सापडल्यास उद्या सामनामध्ये छापा


- देशात चांगलं बदल व्हावा यासाठी तुम्हाला निवडून दिलं, पण तुम्ही स्वत:च म्हणतात, देश बदल रहा है


- शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकतात... मग स्वातंत्र्यवीर सावकरकरांना अद्यापपर्यंत भारतरत्न का नाही?


- स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांतीकारकांचं दालन मुंबईत बनवणार


- माता म्हणतील, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या हाती शिवसेनेचा झेंडा


- यांनी चरख्यावरुन गांधीजींना हटवलं आहेच... त्यामुळे मोदीच देशाचे राष्ट्रपिता होते असं जनतेला वाटायला लागेल


- मोदी स्वत: 10 लाखाचा कोट घालतात आणि मनमोहन सिंह यांचं रेनकोट पाहतात


- मी काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा विरोध करणार आणि सत्यासाठी, चांगल्यासाठी भाजपचाही विरोध करणार


- आम्ही सुद्धा मोदी-मोदी करत होतो. पण विधानसभेच्या वेळेला तुम्ही शेवटपर्यंत आम्हाला घोळवत ठेवलं


- इतकं वर्ष तुमच्या पाठीशी राहिलो, तुम्ही पाठीत वार करता


- महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात फोल मुख्यमंत्री


- मातोश्री, ठाकरे कुटुंबावर आरोप करतात. पण विसरु नका अखंड महाराष्ट्रासाठी माझ्या आजोबांनी लढा दिला होता


- शिवसेनेचा अपमान त्यावेळेला मी सहन केला


- काँग्रेस गेली आता आपलं सरकार यावं यासाठी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं तुम्ही 5 वर्ष सरकार चालवा


- आम्हाला मुंबई पाहिजे ती मुंबईची सेवा करण्यासाठी पाहिजे, चांगली कामं करायला हवी आहे