मुंबई :  मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आपण राजकीय भाषण करणार नाही असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोंड सुख घेतले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचं भाषण:


- आज आपल्या मातृभाषेचा उत्सव आहे. 
- आज राजकीय काही बोलणार नाही. कारण अर्थाचा अनर्थ निघू शकतो
- बऱ्याच दिवसांनी मराठी भाषणाचं वेगळं रूप पाहायला मिळालं
- गेले दोन महिने सुरु होती ती फक्त कचकच...
- माझ्यावर टीका होते की आम्ही मराठी - मराठी करतो पण यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतात
- पण आमची मुलं इंग्रजी जितकं उत्तम बोलतात तितकंच उत्तम मराठी देखील बोलतात
- दर वर्षी या दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पाहिजे, मराठी भवन उभारलं पाहिजे असं बोललं जातं पण करत कोणीच काही नाही
- तुम्हाला अधिकार दिलेला आहे. जमत नसेल तर शिवसेना एकटी करायला समर्थ आहे
-मला पुन्हा एकदा लोकाधिकार हवी आहे. झोकून काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत.
- आयाराम - गयाराम सुरु असतं... तसं होता कामा नये अन्यथा आपला भाजप व्हायला वेळ लाहणार नाही
- पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपले कारभार सोडून प्रचारात व्यस्थ
- लष्करभरतीचा पेपर फुटतो. ज्यांच्या हातात देशाची सुरक्षा आहे त्यांचा पेपर सुरक्षित नाही, कुठल्या दिशेने चाललोय आपण
- याचं कारण देशाच्या कारभारावर कोणाचं लक्षच नाही
- युतीत सडलो, आता त्याचं दुःख करून काही मिळणार नाही
- शिवरायांना, कुसुमाग्रजांना आणि बाळासाहेबांना अभिमान वाटेल अशी शिवसेनेची वाटचाल भविष्यात करू
- आज मराठी भाषा दिनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागेचं हस्तांतरण झालं हा खूप चांगला योगायोग