मुंबई : योगी आदित्यनाथांनी दिलेल्या कर्जमाफीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं खास अभिनंदन केलंय. आदित्यनाथ यांनी राज्यातील शेतक-यांचा विचार करुन कर्जमाफीचा निर्णय घेऊन दिलासा दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानीही असाच निर्णय़ घेऊन कर्जमाफीची घोषणा करावी असं ते म्हणाले. दरम्यान शिवसेना कायम शेतक-यांसोबत राहणार असल्याचे शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला आज विरोधकांनी धारेवर धरलं आहे, यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना म्हटलंय, उत्तर प्रदेश मॉडेलचा अभ्यास करू.