मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील साकेत ब्रिजचं काम सुरु असल्यामुळे गेले काही दिवस नाशिकहून मुंबईकडे येणा-या वाहतूकीवर परिणाम झाला होता. आता उद्यापासून सुरु होणा-या कामाचा परिणाम मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर होणार आहे. डागडुजीसाठी हा रस्ता १५ दिवस बंद राहणार आहे.


मुंबईकडून नाशिककडे जाण्याचा जर तुमचा प्लॅन असेल तर मग यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा.