मुंबई : वर्ल्ड टी 20 च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला आणि भारतीय चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. या पराभवानंतर भआरतीय संघावर चहू बाजूंनी टीका झाली. शनिवारी भारत आणि पाकिस्तान या सामन्यात लढत होणार आहे. भारतावर असणारा ताण कमी करण्यासाठी भारताच्या मदतीला धावून आलेत बिग बी अमिताभ बच्चन.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"टीम इंडिया चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत," असं अमिताभ बच्चन म्हणालेत. इतर कोणच्याही सामन्यापेक्षा भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा दबाव सर्वात जास्त असतो. त्यामुळे या दडपणात आधार देण्यासाठी अमिताभ बच्चन आता पुढे आलेत.


दरम्यान या सामन्याच्या सुरुवातीला अमिताभ भारताचे राष्ट्रगीतही गाणार आहेत. त्यांच्या या खास इनिंगकडेही त्यांच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. वर्ल्ड टी 20 च्या भारत पाक सामन्याला आज संध्याकाळी 7.30 वाजतो कोलकात्ता येथील ईडन गार्डन क्रिकेट मैदानावर सुरुवात होईल.