मुंबई : वर्ल्डकप टी-२० मध्ये भारताने बांग्लादेशवर मिळवलेला विजय हा कोणीच विसरु शकत नाही. कारण जवळपास पराभवाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भारतीय संघाने ती मॅच जिंकली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने बांग्लादेशवर फक्त १ रनने विजय मिळवला होता. या मॅचमध्ये विजयानंतर प्रत्येक भारतीय खेळाडूने पार्टी केली असेल पण बांग्लादेशच्या खेळाडूंसाठी तो अतिशय निराशाजनक आणि धक्कादायक पराभव होता जो ते कधीच विसरु शकणार नाही.


बांग्लादेशचा कर्णधार मुर्तजा सध्या काश्मिरमध्ये आहे. त्याने एक मोठा खुलासा केला आहे. ज्या दिवशी बांग्लादेश मॅच हारला त्या दिवशी कोणत्याच खेळाडूने जेवन केलं नाही. सगळे खेळाडू हे उपाशिच झोपले असल्याची माहिती मुर्तजाने दिली. यावरुनच तो पराभव त्यांच्या किती जिव्हारी लागला हे लक्षात येतं.