मुंबई :  टीम इंडियाने पहिल्या टी-२० सराव सामन्यात वेस्ट इंडीजला लोळवल्यानंतर आता अखेरचा सराव सामना मुंबईत द.आफ्रिकेसोबत होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी होणाऱ्या या सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून आपली विजयी घौडदौड काम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. 


पहिल्या सराव सामन्यात भारतातने वेस्ट इंडिजचा ४५ धावांनी पराभव केला. त्यात रोहित शर्मा याने ९८ धावांची धुवाँधार खेळी केली.  


कोलकत्यात झालेल्या या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर १८६ धावांचे आव्हान ठेवले होते. पण वेस्ट इंडिजचा संघ १४० धावात गारद झाला. 


गेल्या वर्षी झालेल्या टी-२० सामन्यात द. आफ्रिकेने भारताला ०-२ ने नमावले होते.