अलीगड  : क्रिकेटच्या सामन्यात पंचाने दिलेल्या निर्णयाचा राग आल्याने त्याने अंपायरच्या बहिणीलाच ठार मारलं. अलीगडपासून २० किमी अंतरावर जरारा गावात आयपीएलसारखी क्रिकेट स्पर्धा सुरू होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी होता. स्पर्धा २७ मे पर्यंत सुरळीत होती. या स्पर्धेतील २८ मे रोजीच्या सामन्यात अंपायर राजकुमारने बॉलरला नो बॉल टाकल्याचं सांगितलं, राजकुमारने हुज्जत घातली पण अंपायर आपल्या निर्णयावर ठाम होता. 


बॉलर संदीपने याने यावर अंपायरला धमकीही दिली. संदीपने दुसऱ्या दिवशी राजकुमारची बहिण शेतात जात असताना तिला गाठलं. यावेळी त्याने राजकुमारची बहिणी पूजा आणि तिच्या तीन मैत्रिणींना कोल्ड्रिंक्समध्ये विष मिसळून पाजलं. यात उपचारादरम्यान पूजाचा मृत्यू झाला. पूजाच्या मैत्रिणींवर उपचार सुरू आहेत.