मुंबई : आयपीएल-९ मध्ये विराट कोहली हा आत्तापर्यंत त्याच्या सगळ्यात बेस्ट फॉर्ममध्ये दिसला आहे.  त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील झाला. कोहली हा सर्वात खतरनाक बॅट्समन असल्याचे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने म्हंटले आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा विख्यात बॉलर वसीम अक्रमने एका मुलाखतीत सांगितले की आज जर मी विराटला बॉलिंग करणार असतो तर नक्कीच घाबरलो असतो. आयपीएल-९ च्या पर्वात विराटने एकूण ९१९ रन्स केले. आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या सर्व पर्वात विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे ज्याने एकाच पर्वात ४ शतके ठोकली आहेत.

तंत्रशुद्ध बॅटिंग, आत्मविश्वास, क्रिकेटिंग शॉट्स आणि बॅटचा पुरेपूर वापर या गुणांमुळे विराट एक उत्तम खेळाडू ठरला आहे. आज जसा विराट खेळतोय त्यावरून सचिनच्या खेळीची आठवण होते. सचिनला देखील बॉलिंग करणे सोपे नव्हते. विराट आणि सचिन असे बॅट्समन आहेत ज्यांची विकेट घेणे हे बॉलर्स समोरचे एक खूप मोठं आव्हान असतं.