नवी दिल्ली : आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कप टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कप आणि टी - २० वर्ल्ड कप या दोन्हीसाठी महेंद्रसिंग धोनीच कर्णधार असेल हे स्पष्ट करण्यात आलेय. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीच्या बैठकीत टीम इंडियाची निवड करण्यात आली.


आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कपसाठी टीममध्ये अजिंक्य रहाणेची निवड झाली आहे. रहाणेला संधी मिळते की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणाऱ्या मनिष पांडेला संधी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, रहाणेच बाजी मारलेय. तसेच युवराज सिंगलाही कायम ठेवण्यात आले आहे.


टीममध्ये महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य राहणे, आर. अश्विन, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, रवींद्र जाडेजा, उमेश यादव, भुवनेश्वरकुमार, मोहमद शमी, पवन नेगी, युवराज सिंग, हरभजन सिंग