विशापट्टणम : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेमध्ये भारताचा 190 रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ही वनडे सीरिज 3-2नं खिशात घातली आहे. 270 रनचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडचा 79 रनवर धुव्वा उडाला. किवींच्या पाच बॅट्समनना अमित मिश्रानं तंबूत पाठवलं, तर अक्सर पटेलला दोन विकेट मिळाल्या. उमेश यादव, जसप्रित बुमराह आणि जयंत यादवला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि रोहित शर्मा (70 ) आणि कोहलीच्या (65) रनच्या खेळीमुळे भारताला 50 ओव्हरमध्ये 269-6 पर्यंत मजल मारता आली. कॅप्टन धोनी (41) केदार जाधवच्या नाबाद 39 आणि अक्सर पटेलच्या 18 बॉलमध्ये केलेल्या 24 रनमुळे भारताला सन्मानजनक रनपर्यंत पोहोचवलं.