कोलकाता : भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई होती. पण पुन्हा एकदा संकटाच्या वेळी भारताचा तुफानी फलंदाज विराट कोहली संकटमोचका प्रमाणे धावून आला आणि देशासाठी आणखी एक चांगली खेळी त्याने खेळून दाखवली.


विराट कोहली आणि युवराजने मधली खेळी सांभाळली आणि विजयाजवळ भारत पोहोचला. त्यानंतर पुन्हा एकदा जगातील सर्वोत्कृष्ट फिनीशर महेंद्र सिंग धोनी याने उत्तमपणे मॅच फिनिश केली आणि भारताने पाकिस्तान विरोधातला सलग ११ वा विजय मिळवला. तर टी-20 वर्ल्डकपमधला सलग ६ वा विजय मिळवला.