मुंबई : कानपूर टी-20 मध्य़े टीम इंडियाला पाहुण्या इंग्लिश टीमकडून 7 विकेट्सनी पराभव सहन करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅप्टन ईयॉन मॉर्गननं 51 रन्सची कॅप्टन्सी इनिंग खेळत आपल्या टीमला विजय साकारुन दिला. त्याला 46 रन्स करत जो रुटनं चांगली साथ दिली.


टीम इंडियानं इंग्लंडसमोर विजयासाठी 148 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मॉर्गनच्या टीमनं अवघ्या तीन विकेट्स गमावूनच पार केलं. 


भारतीय बॅट्समनना या मॅचमध्ये अजितबात सूर गवसला नाही. महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना वगळता एकाही बॅट्समनला चमकदार कामगिरी करता आली नाही. 


आता सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी टीम इंडियाला दुसरी टी-20 जिंकावीच लागणार आहे.