कानपूर : भारत आणि इंग्लंड यांच्यात २६ जानेवारीपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरु होतेय. २६ जानेवारीला कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी दोन्ही संघ कानपूरला पोहोचलेत. दोन्ही संघांसाठी शहरातील एकुलत्या एक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलीये. तसेच टीम इंडियासाठी खास व्यवस्था कऱण्यात आलीये.


हॉटेल मॅनेजमेंटच्या माहितीनुसार टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूच्या रुममध्ये त्यांच्या आईचा फोटो असणार आहे त्यासोबतच फोटोमध्ये एक मेसेज लिहिलेला असेल. 


मंगळवारी आणि बुधवारी दोन्ही संघ सामन्यासाठी सराव करतील. २६ जानेवारील दुपारी साडेचार ते साडेसात दरम्यान हा सामना रंगणार आहे.