हैदराबाद : भारत आणि बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक कसोटीआधी भारतीय क्रिकेटर्समध्ये तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली. मंगळवारी सरावादरम्यान व्हॉलीबॉल खेळताना मैदानावर भारतीय क्रिकेटपटू एकमेकांशी भांडू लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन संघ बनवून हे क्रिकेटपटू व्हॉलीबॉल खेळत होते. हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि इशांत शर्मा एका संघात तर दुसऱ्या संघात उमेश यादव, करुण नायर खेळत होते. त्यादरम्यान चर्चा होत असताना त्या चर्चेचे रुपांतर वादात झाले. 


यावेळी दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी भिडले. प्रकरण इतके वाढले कर्णधार विराट कोहली आणि आर. अश्विनला मध्यस्थी करावी लागली.