मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील कालचा मुकाबला चांगलाच रोमहर्षक झाला. या सामन्यात मुंबईने कोलकात्याला हरवत या हंगामातील पहिला विजय साजरा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयात चमकले ते युवा क्रिकेटपटू नितीश राणा आणि हार्दिक पंड्या. कोलकाताच्या १७९ धावांचा पाठलाग करताना नितीश राणा(५०) आणि हार्दिक पांड्या(२९) ने जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. 


राणा आणि पंड्याने २.२ षटकात सहाव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. या सामन्यातील विजयानंतर रोहित म्हणाला, आम्ही महत्वपूर्ण विजय मिळवला. सामना अखेरच्या क्षणापर्यंत रंगला होता. नीतीश आणि पांड्याने चांगला खेळ केला. 


मधल्या षटकांमध्ये आम्ही विकेट लवकर गमावल्यामुळे नुकसान झाले मात्र युवा क्रिकेटपटू नीतीश आणि हार्दिक यांनी खेळपट्टीवर टिकून राहत विजय मिळवून दिला.