नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसांवर आयपीएलचा दहावा हंगाम येऊन ठेपलाय. मात्र त्यापूर्वीच या हंगामाला धक्का बसलाय. भारताच्या तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विन, लोकेश राहुल(रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) आणि मुरली विजय(किंग्ज इलेव्हन पंजाब) हे तिघेही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीयेत. दुखापतीमुळे हे तिनही क्रिकेटपटू खेळू शकणार नाहीयेत.


तर दुसरीकडे भारताचे तीन क्रिकेटपटू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहेत. यात कर्णधार विराट कोहलीसह, उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.