नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सामना म्हणजे हायवोल्टेज सामना. त्यामुळेच की काय पाकिस्तानच्या गुजरांवाला भागात भारत-पाकिस्तान सामन्याआधी तेथील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील कार्डियो वॉर्डातील टीव्ही सेट हटवण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी जीव की प्राण. सामन्यानंतर कोणतीही अनुचिक घटना होऊ नये यासाठी सामन्याआधीचे येथील टीव्ही सेट हटवण्यात आले. कार्डियो वॉर्डमध्ये हृद्यरोगाचे पेशंट असतात. 


या सामन्यादरम्यान मोठा तणावही असतो. याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून येथील वॉर्डातील सर्व टीव्ही सेट हटवण्यात आले. मात्र सामन्यानंतर तेथे पुन्हा टीव्ही सेट लावण्यात आलेत.