मिरपूर: आशिया कपमधल्या यूएईविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून यूएईनं पहिले बॅटिंग घ्यायचा निर्णय घेतला, पण भारतीय बॉलर्सनी सुरवातीपासूनच दुबळ्या यूएईला दणके दिले. या दणक्यांमुळे यूएईचा संघ सावरू शकला नाही, आणि त्यांना 20 ओव्हरमध्ये फक्त 81 रनचा टप्पा गाठता आला. यामध्ये त्यांनी आपले 9 बॅट्समन गमावले. 


त्यानंतर 82 रनचं लक्ष्य गाठताना भारतानं फक्त आपली एकच विकेट गमावली. 28 बॉलमध्ये 39 रन करून रोहित शर्मा आऊट झाला, तर शिखर धवननं नाबाद 16 आणि युवराज सिंगनं नाबाद 25 रन बनवले.  


या मॅचमध्ये भारत जिंकला असला तरी त्याचं आशिया कपच्या फायनलमधलं तिकीट आधीच निश्चित झालं होतं. भारताची फायनलमध्ये बांग्लादेशशी गाठ पडणार आहे.