मुंबई : राजकोट कसोटीदरम्यान भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीवर बॉल कुरतडल्याच आरोप एका इंग्लंडमधील एका दैनिकाने केला होता. या आरोपांवर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी वृत्तपत्र वाचत नाही. असे काही घडल्यानंतर मला 5 दिवसांनी कळले. मला यावर केवळ हसू आले,' असे कोहली म्हणाला. 'तसेच मालिकेवरील लक्ष केंद्रित करु नये यासाठीचा हा प्रयत्न असावा. आयसीसीच्या निर्णयापुढे वृत्तपत्रातील आर्टिकलचे मला महत्त्व वाटत नाही', असे कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


याआधीही भारतीय टीमचा प्रशिक्षक अनिल कुंबळेनेही विराटवरील हे आरोप फेटाळून लावले होते. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0ने आघाडीवर आहे.