मोहाली: मोहीलीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवून टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये विराट कोहलीनं 51 बॉलमध्ये 82 रनची खेळी केली. विराटच्या या शानदार खेळीमध्ये 9 फोर आणि 2 सिक्सचा समावेश आहे. 


या अफलातून खेळीमुळे विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवण्यात आलं. ही खेळी म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधली टॉप 3 पैकी एक खेळी असल्याची प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली आहे.