मुंबई : भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि अनु्ष्का शर्मा यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता अशी खबर मिळालीये की विराट अनुष्काला मनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. यासाठी तो अनुष्काच्या भावाच्या संपर्कात आहे. अनुष्का आणि त्याच्यातील संबंध भावाच्या मदतीने सुधारतील अशी त्याला आशा आहे. 


विशेष म्हणजे जेव्हा विराटने अनुष्काला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते तेव्हा त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. त्यानंतर विराटने एका पार्टीदरम्यान आपण सिंगल असल्याचे म्हटले होते. तसेच विराटने इन्स्टाग्रामवर अनेक फोटोज शेअर करुन ब्रेकअप झाल्याचे सांगितले होते.