राजकोट : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीने गुजरात लायन्सच्या विरुद्ध दमदार नाबाद शतक झळकावले. मात्र त्याचे हे शतक संघाला विजय मिळवून देऊ शकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळेच शतक झळकावल्यानंतरही पराभवामुळे वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया विराटने सामना संपल्यानंतर दिली. 


खरतरं सामना हरल्यामुळे वाईट वाटते. मला वाटत होते की शतक करेन आणि आम्ही सामना जिंकू. याआधीच्या दोन सामन्यात माझे शतक हुकले होते. व्यक्तिगत प्रदर्शन चांगले झाले मात्र सामना न जिंकल्याचे वाईट वाटतेय, असे कोहली म्हणाला.


या सामन्यात बंगळूरुने प्रथम फलंदाजी करताना १८० धावा केल्या होत्या. गुजरात लायन्सने हे आव्हान तीन चेंडू राखत पूर्ण केले आणि विजय मिळवला.