मथुरा : भारत-वेस्ट इंडिज दरम्यान टी-20 सेमीफायनल सामन्या दरम्यान एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मॅचदरम्यान एका युवकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. पण त्याच्यावर कोणी ही लक्ष न दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.


युवकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार युवकावर काही लोकांनी हल्ला केला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण प्राथमिक उपचारानंतर डॉक्टर आणि कर्मचारी हे मॅच बघण्यात व्यस्त झाले. त्यानंतर सकाळी या युवकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.