रांची : शुक्रवारी झालेल्या श्रीलंकेविरोधात झालेली दुसरी टी-20 भारताने ६९ रन्सने जिंकली.  पण कालच्या सामन्यात एक वर्ल्ड रेकॉर्ड बनता बनता राहिला. युवराज सिंगने काल एक रन जरी काढला असता तरी हा रेकॉर्ड त्याच्या नावे झाला असता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टी-२० मध्ये युवराज पहिल्याच बॉलमध्ये मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. जर त्याने एक रन जरी काढला असता तर तो टी-२० फॉरमॅटमध्ये ४० सामन्यांमध्ये एकदाही शुन्य रनवर आऊट न होण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे झाला असता. सध्या हा रेकॉर्ड शोएब मलिक याच्या नावावर आहे.


३९ सामन्यांसह युवराज आता दुसऱ्या स्थानकावर आहे.