PHOTO : पाकिस्तानमध्ये जन्म, पण भारतावर प्रेम; पद्मश्री पुरस्कार अन् वाद, 18 वर्षात 4 वेळा निकाह

नेहा चौधरी Thu, 15 Aug 2024-8:57 am,

लंडनमध्ये जन्मलेला या चिमुकल्याला त्याच्या नागरिकत्वामुळे खूप संघर्ष करावा लागला. त्याने पाकिस्तानमध्ये बराच काळ व्यतित केला होता. त्यामुळे त्याला भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी खूप वादातून जावं लागलं. पण अखेर त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं. 

15 ऑगस्ट 1971 साली लंडनमध्ये जन्माला आवाजाचा जादूगार अदनान सामी. वडील पाकिस्तानी हवाई दलात पायलट तर आई नौरीन खान एक भारतीय होती. त्या जम्मूची रहिवासी होती. अदनान कॅनडा आणि संयुक्त अरब अमिरातीमध्येही राहिला. पण जे प्रेम आणि आदर त्याला भारतात मिळाला ते त्याला कुठेच मिळालं नाही. याच कारणामुळे अदनान सामीने भारतात, मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 

या व्यक्तीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याचा गाण्यामुळे तो चाहत्यांचा मनावर राज्य करतो. पण त्याशिवाय वजन, नागरिकत्व, अश्लिल व्हिडीओ, बनावट पदवी आणि 4 वेळा निकाह, अशा वादग्रस्त आयुष्यामुळे तो कायम चर्चेत असतो. 

त्याने एका मुलाखतीत मला मुंबईत खूप छान आणि आरामदायी वाटतं. म्हणून मी भारतीय नागरिकत्व घेतलं असं सांगितलं. त्यामुळे त्याचे पाकिस्तानमधील चाहते नाराज झाले. सोशल मीडियावर लोक अदनान सामीला 'देशद्रोही' म्हणू लागले. पण त्याने कसलीही पर्वा केली नाही. एवढंच नाही तर 2016 मध्ये अदनान सामीने एका ट्विटने पाकिस्तानाची झोप उडवली. त्याने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकच्या भारताच्या निर्णयाचं त्याने कौतुक केलं होतं. 

एक काळ असा होता की अदनान सामीचं वजन हे 230 किलोपर्यंत गेलं होतं. त्यामुळे त्याला अनेक आरोग्याशी संबंधिक समस्यांचा सामना करावा लागत होता. एकदा त्याची तब्येत एवढी खराब झाली की, डॉक्टरांनी सांगितलं वजन कमी करा नाही तर सहा महिन्यांपेक्षा जास्त जगू शकत नाही. 

मृत्यूच्या भीतीने अदनामने कुठलीही शस्त्रक्रिया न करता 15 महिन्यांत 165 किलो वजन कमी केलं. वजन कमी करण्यासाठी त्याने आहारावर विशेष लक्ष दिलं होतं, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

अदनान सामी गेल्या 24-25 वर्षांपासून मुंबईत राहतो. पण जेव्हा 2020 मध्ये अदनानला पद्मश्री पुरस्काराशी निवडण्यात आलं तेव्हा भारतात एकच नाराजीचा सूर उमटला. राष्ट्रवादीसह अनेक राजकीय पक्षांनी याला विरोध केला. अदनानला पद्मश्री देणे म्हणजे 130 कोटी भारतीयांचा अपमान असेल असं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं होतं.  

अदनान सामी गायिका आशा भोसले यांना त्यांची 'संगीत आई' म्हणतो. आशा भोसले यांनीच त्यांना संगीताच्या जगात येण्याचा सल्ला दिला होता. अदनान सामी 10 वर्षांचा असताना आशा भोसले यांना पहिल्यांदा भेटला होता. आशा भोसले यांनीच त्यांना कॅनडातून भारतात ये आणि इथेच करिअर कर, असं म्हटलं होतं. आशा भोसले यांचा सल्ला घेण्यासाठीच अदनान सामी भारतात आला होता. पण त्यांना आशा भोसले यांच्यासोबत 'कभी तो नजर मिलाओ' हे पहिलं गाणं गाण्याची संधी मिळाली. अदनान सामीच्या स्टारडमची सुरुवात झाली. 

अदनानचं पहिलं लग्न 1993 मध्ये हे ऋषी कपूरची अभिनेत्री हिना म्हणजे अभिनेत्री झेबा बख्तियारशी केलं होतं. त्यांना अजान सामी नावाचा एक मुलगा आहे. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही.

त्यानंतर त्याचा आयुष्यात बिझनेसवुमन अरब सबा गलदारी आली. त्यांचा अफेयरची चर्चा सुरु असताना त्यांनी निकाह केला. पण हेही लग्न 2 वर्षातच तुटलं.

 

आता अदनान एकटा पडला होता. अशा परिस्थितीत त्याची पहिली पत्नी झेबा 2008 मुंबईत आली. या दोघांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता ते दोघे एकत्र राहत होती पण पुन्हा त्यांना जाणवलं हे नातं पुढे जाऊ शकतं नाही. त्या दोघांनी पुन्हा घटस्फोट घेतला. 

अदनानने चौथ लग्न 2010 मध्ये रोया सामी खानशी केलं. त्यांना एक मुलगी आहे. पण अदनानची लग्नाचा प्रवासही खूप कठीण होता. त्याचा दुसऱ्या पत्नीने त्याच्यावर अनेक आरोप केले. मारहाणीपासून लैंगिक छळापर्यंत...पण यावेळी त्याची पहिली पत्नी झेबा त्याचा पाठिशी उभी होती. तिने अदनान असं करु शकतं नाही, असं सांगितलं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link