घनदाट धुकं आणि हिरवाईने नटलेले डोंगर, भारतातील `या` ठिकाणांना नक्की भेट

Fri, 12 Jul 2024-11:14 am,

तामिळनाडूतील हे ठिकाण अतिशय नयनरम्य आहे. तामिल भाषेत कोडाई म्हणजे ऊन आणि कनाल म्हणजे पाहणे. थंड हवेचं ठिकाणं असल्यामुळं खास ऊन्हाळ्यात पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होते. पावसात आणि थंडीत इथले डोंगर हिरव्या रंगाची चादर पांघरतात.  पावसाळ्यात इथल्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात धुकं दाटतं.  फोटोशुटसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. 

सिक्कीमला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. गंगटोकच्या जवळ असलेलं पेलिंग डोंगरात वसलेलं छोटसं गाव. पेलिंगचा परिसर हा दऱ्या खोऱ्यांनी वेढलेला असल्याने इथं मोठ्या प्रमाणात धुकं पाहायला मिळतं. 

 

देशात सर्वाधिक चहाचे मळे दार्जिलींगमध्ये आढळतात, त्यामुळे जगभरातील अनेक चहाप्रेमी इथल्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. मात्र या व्यतिरिक्त दार्जिलींगची वेगळी ओळख म्हणजे इथलं निसर्गसौंदर्य. थंड हवेचं ठिकाण असल्याने दार्जिलींग कायमच धुक्यात हरवलेला असतो. 

 

पुण्या-मुंबईपासून जवळंच आणि एका दिवसात जाता येईल असं ठिकाण म्हणजे लोणावळा. लोणावळा घाट म्हणजे पुणे-मुंबईतील पर्यटकांचं हक्काचं ठिकाण. पाऊस पडल्यानंतर दाटलेलं धुकं आणि इंद्रधनुष्य पाहणं म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती असते.   

पावसाळ्यात गड किल्यांवर ट्रेकिंगला जायला अनेकांना आवडतं, शुरवीरांचा इतिहास सांगणाऱ्या रायगडाचं सौंदर्य पावसाळ्यात विलोभनीय असतं. हिरवाईने नटलेल्या आणि धुक्याने वेढलेल्या रायगडला एकदा तरी भेट द्यायलाच हवं. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link