Vastu Shastra tips : लहानपणी आपल्याला नेहमी शेअर करायला शिकवलं जातं  तसाच आपल्या आयुष्यात काय घडत ते आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा मित्र मैत्रिणींना सांगतो पण तुम्हाला माहीत आहे तुमची हीच सवय तुम्हाला कंगाल करू शकते, चला तर जाणून घेऊया याविषयी... वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट आपण आपापसात शेअर केली पाहिजे, परंतु 5 गोष्टी कधीही दुसऱ्यांसोबत शेअर करु नयेत. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे कुटुंबात आर्थिक संकट, आजार आणि कलहाचा काळ सुरू होतो. या 5 गोष्टी, ज्या कधीही दुसऱ्यांसोबत शेअर करु नयेत. 


दुसऱ्यांच्या चपला, बुट घालणे टाळा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तुशास्त्रानुसार, चपला, बुट मागवून आपण कधीही इतरांचा वापर करु नये. असे करणे अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार शनिदेवाचा वास मनुष्याच्या पायात असतो. अशा वेळी जर आपण इतरांचे बूट आणि चप्पल घातली तर शनीचा प्रकोप आपल्यावर चढू शकतो. असे केल्याने घरामध्ये दारिद्र्य आणि दुःख येते. 


दुसऱ्यांचे घड्याळ मागू नये, हे अशुभ आहे  


वास्तुविशारदांच्या मते, आपण इतरांची घड्याळ घालू नये. याचे कारण म्हणजे घड्याळ केवळ वेळच सांगत नाही, तर माणसाच्या आयुष्यातील चांगले-वाईट काळही त्याच्याशी निगडीत असतात. अशा परिस्थितीत जर एखाद्यावर वाईट वेळ येत असेल आणि तुम्ही त्याला घड्याळ घालण्यास सांगितले तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरही होऊ शकतो.


मित्रांची अंगठी घालू नका 


आपण आपल्या बोटात कधीही दुसऱ्याची अंगठी घालू नये. किंबहुना अंगठी असो की रत्न-धातू असो, ते कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी किंवा राशीशी संबंधित असतात. त्यामुळे जर तुम्ही इतरांची अंगठी किंवा रत्न धारण केले तर त्याचा तुमच्या जीवनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.


पेन उधार घेतले असेल तर ते परत करा


जेव्हा आपण बँकेत किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा आपण अनेकदा इतरांकडून पेन मागतो आणि नंतर परत देण्यास विसरतो. वास्तुशास्त्रानुसार हा चुकीचा मार्ग आहे. पेन किंवा पेनशी दुसऱ्या व्यक्तीचे भवितव्य जोडलेले असते. अशा परिस्थितीत, जर त्या व्यक्तीच्या जीवनात वाईट टप्पा सुरु असेल, तर तुम्ही अनवधानाने त्याचा पेन घेऊन स्वतःवर संकट ओढवून घेता. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कधी दुसर्‍याचा पेन घ्यावा लागला तर ते परत करण्यास विसरु नका हे लक्षात ठेवा. 


इतरांचे कपडे घालू नका 


मित्र आणि कुटुंबीयांमध्ये वारंवार कपडे बदलणे सामान्य आहे. आपण हे करु नये असे वास्तुशास्त्र सांगत असले तरी याचे कारण म्हणजे एका व्यक्तीच्या शरीरातील संसर्ग कपड्यांची अदलाबदल करुन दुसऱ्या व्यक्तीपर्यंतही पोहोचू शकतो. त्याचवेळी, त्या व्यक्तीचे दुर्दैव देखील स्वतःवर वर्चस्व गाजवू शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची खातरजमा करत नाही.)