मुंबई : आजची रात्र महत्त्वाची आहे. आज आकाशात तब्बल सात ग्रहांचं मिलन होणार आहे. या सात ग्रहांच्या मिलनाचे तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहेत. आजची रात्र यासाठी स्पेशल ठरणार आहे. आज सात ग्रहांचं मिलन होणार आहे पण याचा जगावर नेमका काय बदल होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक वेगळंच मिलन आज आकाशात घडणार आहे. रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी चंद्र मकर राशीत प्रवेश करत आहे.. मकर राशीत आधीपासूनच सूर्य, गुरु, शुक्र, शनि, बुध आणि प्लुटो आहेत. आता चंद्रानं प्रवेश केल्यानंतर सात ग्रहांचं मिलन होणार आहे. सात ग्रहांच्या या मिलनाचा भारत आणि जगावर मोठा परिणाम होणार असल्याचं ज्योतिषी सांगतात.... 



 


काही ज्योतिषांच्या सांगण्यानुसार, देशातील तणाव वाढण्याचा दावा करण्यात आला आहे. नैसर्गिक संकटं येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक युद्ध परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना महामारी आणखी प्रबळ होण्याचा अंदाज आहे. आणखी काही विषाणूसदृश आजार बळावण्याचा दावा केला आहे. तसेच दुर्घटनांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. महागाई वाढण्याची शक्यता असून मनुष्यहानी आणि वित्तहानी होण्याचा दावा करण्यात आला आहे.


भारतात राजकीय उपद्रव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अनेक सामाजिक -राजकीय बदलांची शक्यता आहे. त्याबरोबरच जगात भारताचं वर्चस्व वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता या सात ग्रहांच्या मिलनानंतर नेमकं काय होणार, हे कळेलच.