मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात काही राशींसाठी चांगली झाली असली तरी संकटाची चाहूल मात्र लागली आहे. 4 राशीच्या व्यक्तींना 33 दिवस मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. याचं कारण म्हणजे शनी प्रवर्तन होणार आहे त्यामुळे चार राशीच्या लोकांनी सतर्क राहाणं फार आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिदेव 29 एप्रिल रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनिदेव अडीच वर्षे कुंभ राशीत राहतील. मात्र याआधी शनिदेव 33 दिवस अस्त करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार सर्व राशींवर शनि आणि अस्ताचा विशेष प्रभाव पडतो. पण काही राशींवर शनि ग्रहाचा विशेष प्रभाव पडेल. 


मिथुन : या राशीसाठी पुढचा काही काळ वेदनादायी ठरणार आहे. कामात सतत अपयश आल्याने मन अस्वस्थ राहील. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जास्त पैसे खर्च केल्यामुळे जोडीदारासोबत मतभेद होतील. नोकरीत अडचणी येऊ शकतात. व्यवसायात आर्थिक नुकसानही होऊ शकते.


कर्क : या राशीच्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. आर्थिक नुकसान होऊ शकतं. कामात निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम होतील.


कन्या : नोकरीतही अडचणी येऊ शकतात. मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. नोकरीतही अडचणी येतील. कामात मन स्थिर राहणार नाही. नकारात्मक विचार आणि परिणाम दिसून येतील. 


तुळ : शनि ग्रहणाचा सर्वात वाईट प्रभाव पडेल. कायदेशीर वादात अडकू शकता. मानसिक त्रास होईल. नोकरीत कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होतील. मन अस्वस्थ राहणार त्यामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. 


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)