मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अनुष्का - विराटच्या विवाहाच्या बातमीला अफवा सांगितलं जात असलं तरी अत्यंत खाजगीरित्या हे दोघं डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विवाह बंधनात अडकत असल्याचं समोर येतं आहे.


१२ डिसेंबरला विवाह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि दिल्ली विमानतळावर दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. १२ डिसेंबरला हा विवाह होणार असल्याचं बोललं जातंय. अनुष्काच्या वडिलांनी लग्नासाठी फक्त खास लोकांना आमंत्रण दिलं आहे. कारण प्रत्येकाला इटलीला जाणं शक्य नाही. अनुष्काचे वडील हे भारतीय आर्मीमध्ये अधिकारी होते.


२ खेळाडूंनाच आमंत्रण


विवाहासाठी फक्त सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह या दोघांनाच आमंत्रण असल्याचं बोललं जातंय. १२ डिसेंबरला इटलीमध्ये दोघांचा विवाह होणार आहे. २१ डिसेंबरला मुंबईत या दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडणार आहे, असं म्हटलं जातं आहे. यावेळी सर्वांना आमंत्रित केलं जाणार आहे.


अनुष्कासाठी १२ लकी नंबर


अनुष्कासाठी १२ हा लकी नंबर आहे म्हणून या तारखेला विवाह होणार असल्याची चर्चा आहे. २००८ मध्ये बॉलिवूड निर्माता आदित्य चोपडा यांनी शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत 'रबने बना दी जोडी' सिनेमा केला होता. हा सिनेमा १२ डिसेंबरला रिलीज झाला होता. या सिनेमातून अनुष्काला मोठं यश मिळालं होतं आणि तिच्या करिअरला सुरुवात झाली होती.


विराटचे कोचही सुट्टीवर


डीडीसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटचे कोच राजकुमार शर्मा यांनी काही वैयक्तिक कारणामुळे सुट्टी हवी असल्याचं म्हटलंय. त्यांचा हा अर्ज मंजूर करण्यात आलाय. त्यांच्याऐवजी रॉबिन सिंग ज्युनिअर यांची दिल्ली टीमच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे.