चेन्नई : आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. आता प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. आयपीएला 12 वा मोसम बंगळुरुसाठी फार निराशाजनक राहिला. बंगळुरुने पहिल्या सहा मॅच गमावल्यानंतर सातव्या मॅचमध्ये विजय मिळवता आला. बंगळुरुच्या कामगिरीवरुन टीमवर आणि पर्यायाने कॅप्टन विराट कोहलीवर देखील सोशल मीडियावरुन टीका केली जात आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या उलटसुलट ट्विटमुळे चर्चेत असणाऱ्या कमाल खानने ट्विट करत विराटवर टीका केली आहे. विराट कोहलीचे मॅचदरम्यान केले जाणारे वर्तवणूक ही बरोबर नसून तो अनेकदा मैदानात उर्मटपणे वागतो. बंगळुरु टीमचे नेतृत्व करत असलेल्या विराट कोहीलीची टीम अंकतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.


 




तर दुसऱ्या बाजूला भारतीय टीमचा माजी कॅप्टन असलेल्या महेंद्र सिंह धोनी चेन्नईचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईची टीम अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. धोनी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे वर्ल्डकपसाठी कर्णधारपद कोहलीकडून काढून धोनीला द्यावी, अशी मागणी कमाल खान याने केली आहे.


 



 


 


 



 


कमाल खानने अशा प्रकारे टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील कमाल खानने कोहलीला लक्ष करत टीका केली होती. कमाल खान सातत्याने आपल्या ट्विटद्वारे विराट कोहलीवर टीकेचे बाण सोडत आहे.