नवी दिल्ली : दिल्लीच्या पालम मैदानात दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान मैदानावर अचानक एक कार घुसली. यावेळी मैदानावर ईशांत शर्मा, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत हे क्रिकेटर होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादी कार अशी अचानक मैदानात येईल याची कुणालाही कल्पना नव्हती. या घटनेनंतर मैदानातील क्रिकेटरच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. 


यावेळी कार चालकाला याबाबत विचारण्यात आले असता तो म्हणाला, मी रस्ता चुकलोय. यानंतरही त्या कार चालकाने दोनवेळा पिचवरुन गाडी चालवली.


यावेळी दिल्लीविरुद्ध उत्तर प्रदेशचा अक्षदीप नाथ खेळपट्टीवर होता. अक्षदीप ११० धावांवर खेळत असताना ही घटना घडली. यावेळी गंभीर, ईशांत शर्मा हे क्रिकेटरही होते. 


उत्तर प्रदेशची सुरुवातीला पडझड झाल्यानंतर अक्षदीपने डाव सावरताना पाचव्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी साकारली. त्यामुळे उत्तर प्रदेशने तिसऱ्या दिवशी सात विकेट गमावताना दुसऱ्या डावात २२४ धावा केल्या.