नवी दिल्ली : भारतामध्ये राखी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. पण क्रिकेटपटू गौतम गंभीरनं रक्षाबंधनानिमित्त कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. गौतम गंभीरनं तृतीयपंथीयांकडून राखी बांधून घेतली आहे. हे फोटो गंभीरनं ट्विटरवरून शेअर करत भावनिक संदेशही दिला आहे. हे पुरुष किंवा महिलांच्याबाबतीत नाही तर माणसांच्याबाबतीत आहे. तृतीयपंथीय अभिना अहेर आणि सिमर शेखकडून राखी बांधून घेताना मला अभिमान वाटत आहे. मी त्यांचा स्वीकार केला आहे, तुम्ही कराल का? असं ट्विट गंभीरनं केलं आहे. गंभीरनं हे फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत.