डर्बी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने जबरदस्त शतक झळकावलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने ९० चेंडूत शानदार शतक झळकावले. तिने यात १२ चौकार आणि दोन षटकार खेचले. एका बाजूला तीन विकेट भारताने झटपट गमावल्या असताना दुसऱ्या बाजूने कौरने किल्ला लढवताना भारताला दीडशेपार धावसंख्या गाठून दिली. 


याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही तिने अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात भारताचा १८६ धावांनी विजय झाला होता.