मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या भारतीय टीमला बीसीसीआयनं बक्षिसाची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआय टीममधील प्रत्येक क्रिकेटपटूला 50 लाख रुपये देणार आहे. तर सपोर्ट स्टाफला 25 लाख रुपये देण्यात येणार आहे. मिथाली राजच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय टीमनं फायनलमध्ये पोहोचण्याचा कारनामा केलाय. 


फायनलमध्ये भारताचा मुकाबला यजमान इंग्लंडशी होणार आहे. या मॅचपूर्वी बीसीसीआयनं जाहीर केलेल्या या बक्षिसामुळे महिला टीमचा आत्मविशास वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.