अहमदाबाद: इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघाचा दणदणीत पराभव झाला आहे. टी 20 मालिकेत इंग्लंडनं 2-1 ने आघाडी घेतली. तिसऱ्या सामन्यादरम्यान पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमी विराट कोहलीवर चिडल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका केवळ क्रिझवर खेळणाऱ्या फलंदाजालाच नाही तर भारतीय संघाला बसला आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंत क्रिझवर असताना विराटची एक चूक ऋषभला महागात पडली. त्या निर्णयामुळे चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असलेला पंत आऊट झाला.


विराट कोहलीच्या चुकीच्या निर्णयामुळे ऋषभ पंत रन आऊट झाला. त्यामुळे भारतीय संघातील एक चांगला फलंदाजी करणारा खेळाडू तंबूत परतल्यानं टीम इंडियाचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर सोशल मीडियावर मात्र पुन्हा एकदा विराट कोहलीवर क्रिकेटप्रेमींनी टीका केली आहे.






ऋषभ पंत रन आऊट झाला यामध्ये कोणाची चूक असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. ऋषभ पंत ड्रेसिंग रुममध्ये विराटची वाट पाहात असल्याची मजेशीर मिम्स देखील तुफान व्हायरल होत आहेत. 12 व्या ओवरदरम्यान दोन धावा काढल्या. मात्र अचानक विराटनं पंतला तिसरी धावा काढण्यास सांगितलं. त्यासाठी ऋषभही पुढे धावत गेला. मात्र तोपर्यंत रनआऊट झाला.


अवघ्या 25 धावा करून पंतला तंबूत परतावं लागलं. विराट कोहलीच्या या निर्णयामुऴे सोशल मीडियावर चाहते चांगलेच संतापले आहेत. अनेक मिम्स व्हायरल होत आहे. तर विराट कोहलीवर टीका केली जात आहे.