IND vs NZ : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून कानपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात एक योगायोग घडला आहे, जे फारच कमी लोकांच्या लक्षात आले असेल. या सामन्यात एकाच शहरातील फलंदाज आणि गोलंदाज आमने-सामने आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे क्वचितच पाहायला मिळते, जेव्हा एकाच शहरातील फलंदाज आणि गोलंदाज आमने-सामने असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक या सामन्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलही खेळत आहे, ज्याचा जन्म मुंबईत झाला आहे. त्याचबरोबर भारतीय संघात मुंबईत जन्मलेल्या श्रेयस अय्यरचाही समावेश आहे. अय्यरने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. अशा परिस्थितीत हा कसोटी सामना खूप खास ठरतो. कानपूर कसोटीनंतर मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी मुंबईत खेळवली जाणार आहे, जिथे किवी गोलंदाज एजाज पटेल आणि टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर या दोघांचा जन्म झाला.


कोण आहे एजाज पटेल?


डावखुरा फिरकीपटू एजाजचा जन्म 21 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईत झाला. एजाज 8 वर्षांचा होता जेव्हा त्याचे कुटुंब न्यूझीलंडला गेले. भारतात आल्यानंतर एजाज म्हणाला की, मी भारतातील अशा ठिकाणी आहे, जिथे मी यापूर्वी कधीही आलो नाही. भारत हा एक अद्भुत देश आहे.


अय्यरचा जन्मही मुंबईत


26 वर्षीय श्रेयस अय्यरचाही जन्म 6 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. अय्यरने नोव्हेंबर 2017 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले. त्याने दिल्लीतच न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला होता. यानंतर तब्बल 4 वर्षांनी अय्यरने आज न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत पदार्पण केले. अय्यरने आतापर्यंत टीम इंडियासाठी 22 एकदिवसीय आणि 32 टी-20 सामने खेळले आहेत. अय्यरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 813 आणि टी-20मध्ये 580 धावा केल्या आहेत. त्याने वनडेतही शतक झळकावले आहे.


दुसरीकडे, अजिंक्य रहाणेचा जन्म 6 जून 1988 रोजी मुंबईपासून 250 किमी अंतरावर असलेल्या अश्वी खुर्द गावात झाला. रहाणेची संपूर्ण क्रिकेट कारकीर्द मुंबईत गेली आहे. सध्या रहाणे आणि त्याचे कुटुंबीय मुंबईला शिफ्ट झाले आहेत. अशा स्थितीत रहाणे हा मुंबईचा खेळाडूही मानला जातो.