केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेमध्ये आहे. २०८ रन्सचा पाठलाग करताना भारतानं चौथ्या दिवशीच्या चहापर्यंत ८२ रन्सवर ७ विकेट गमावल्या आहेत. रवीचंद्रन अश्विन १ रनवर खेळत आहे. आफ्रिकेच्या फिलेंडरनं ३ तर मॉर्कल आणि रबाडाला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक २८ रन्स केल्या आहेत. २०८ रन्सचा पाठलाग करताना मुरली विजय आणि शिखर धवननं भारताला ३० रन्सची सावध सुरुवात करून दिली. पण शिखर धवन १६ रन्सवर तर मुरली विजय १३ रन्सवर आऊट झाला. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या चेतेश्वर पुजाराला ४ रन्स बनवता आल्या. रोहित शर्मा १०, सहा ८ आणि पांड्या १ रन करून आऊट झाला.


त्याआधी भारतीय बॉलर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या ६५ रन्सच्या आघाडीचा फारसा फायदा दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या इनिंगमध्ये उचलता आला नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ १३० रन्सवर ऑल आऊट झाला.


भारताकडून मोहम्मद शमी-जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी २ विकेट घेण्यात यश आलं.


आफ्रिकेनं पहिल्या इनिंगमध्ये २८६ रन्स केल्यानंतर भारताचा डाव २०९ रन्सवर आटोपला. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ मात्र पावसामुळे रद्द झाला. चौथ्या दिवसाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेनं ६५/२ अशी केली होती. दक्षिण आफ्रिकेचे २ खेळाडू शून्य रनवर आऊट झाले तर ४ खेळाडू एकेरी धावसंख्येवर आऊट झाले.