साऊथम्पटन : इंग्लंडविरुद्धची चौथी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला २४५ रनची आवश्यकता आहे. इंग्लंडची दुसरी इनिंग २७१ रनवर ऑल आऊट झाली. भारताला पहिल्या इनिंगमध्ये २७ रनची आघाडी मिळाली होती. चौथ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडला फक्त ११ रन करता आल्या. मोहम्मद शमीनं दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला धक्का दिला आणि ब्रॉडला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तर सॅम कुरन रन आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माला २ विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इंग्लंडकडून जॉस बटलरनं सर्वाधिक ६९ रन केले तर जो रूटनं ४८ आणि सॅम कुरननं आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन महत्त्वपूर्ण ४६ रन केले.


५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं पहिल्या दोन टेस्ट मॅच गमावल्या होत्या. यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये जोरदार पुनरागमन करत भारतानं ही टेस्ट जिंकली होती. त्यामुळे भारत सीरिजमध्ये १-२नं पिछाडीवर आहे. सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही टेस्ट जिंकणं आवश्यक आहे. 


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा