कटक : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं १८१ रन्सचं आव्हान दिलं आहे. टॉस जिंकून श्रीलंकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि भारतानं २० ओव्हर्समध्ये १८०/३ एवढा स्कोअर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून के.एल.राहुलनं ४८ बॉल्समध्ये ६१ रन्स केल्या. राहुलच्या खेळीमध्ये ७ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता. तर धोनीनं २२ बॉल्समध्ये नाबाद ३९ आणि मनिष पांडेनं १८ बॉल्समध्ये नाबाद ३२ रन्स केल्या. श्रेयस अय्यरनं २० बॉल्समध्ये २४ रन्स आणि रोहित शर्मानं १३ बॉल्समध्ये १७ रन्स केल्या.


श्रीलंकेच्या मॅथ्यूज, परेरा आणि फर्नांडोला प्रत्येकी एक विकेट मिळाली. आज होणाऱ्या पहिल्या टी-20नंतर २२ डिसेंबरला इंदोरमध्ये तर २४ डिसेंबरला मुंबईमध्ये तिसरी टी-20 होणार आहे. टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकल्यानंतर आता टी-20 सीरिज खेळण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.