मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाचवा T20 सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात झाली होती. मात्र काही ओव्हर्सनंतर पावसाची बॅटींग सुरु झाली आहे. त्यामुळे चौथ्या ओव्हरनंतर पावसाचा खेळ थांबला आहे. आता हा सामना कधी सुरु होत आहे, याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाची प्रथम फलंदाजी करतायत.  ईशान किशन 15, ऋुतूराज गायकवाड 10 धावांवर बाद झाले आहेत. सध्या क्रिझवर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर सध्या क्रिझवर आहे.  


पाच सामन्यांच्या T20 मालिकेत दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीत आहेत. पाचवा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. त्यामुळे या सामन्यावर कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.