कटक  : टेस्ट सीरिज, वन डे सीरिज जिंकल्यानंतर आता  भारत श्रीलंकेविरूद्ध टी-२० सीरिजदेखील जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेने टॉस जिंकत पहिला बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. 


रोहित शर्माकडे कर्णधारपद  


विराट कोहली आणि अनुष्का ११ डिसेंबरला लग्नबंधनात अडकल्यानंतर आता रिसेपशनच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे सध्या विराट क्रिकेटपासून दूर आहे. पहिल्या टी-20मध्ये भारतीय संघात के.एल.राहुल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह आणि युझुवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे.  


चाहत्यांनी 'विराट'ला मिस केलं 


विराट हा धडाकेबाज फलंदाज आहे. त्याच्या खेळाचा जलवा क्रिकेट पीचवर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. पण उद्या दिल्लीत विरूष्काच्या लग्नाचे रिसेप्शन असल्याने तो लांब आहे. मात्र विराटच्या चाहत्यांनी त्याच्या अनुपस्थितीला दर्शवण्यासाठी खास अंदाज केला होता. 




खास अंदाज  


कटकमध्ये  क्रिकेटच्या पीचवर दोन चाहत्यांनी केसांवर तिरंगा रंगवला होता. तसेच डोक्यावर मिस यू विराट अशा आशयाचे संदेश लिहले होते.