केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळपासूनच केपटाऊनमध्ये पावसाने हजेरी लावल्याने खेळ सुरु झाला नव्हता. दुपारच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली मात्र, पुन्हा पाऊस सुरु झाला आणि अखेर तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मॅचच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकन टीमने २ विकेट्स गमावत ६५ रन्स केले आहेत. तर, आफ्रिकन टीमने भारतावर १४२ रन्सची आघाडी घेतली आहे.


मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकन टीम २८६ रन्सवर ऑल आऊट झाली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने २०९ रन्स केले आणि त्यामुळे आफ्रिकन टीमला ७७ रन्सची आघाडी मिळाली होती. 


दक्षिण आफ्रिकन टीमच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सने चांगली सुरुवात केली आणि दोन बॅट्समनला हार्दिक पांड्याने माघारी धाडले. सध्या दक्षिण आफ्रिकन टीमने २ विकेट्स गमावत ६५ रन्स केले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेने १४२ रन्सची आघाडी घेतली आहे.